प्रसाद कुलकर्णी - नव्या पिढीचा आनंदी आणि आशावादी कवी.

उत्कटता हा त्याच्या कवितेचा आणि स्वभावाचाच गुणविशेष.
तो आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक घटनेवर, प्रत्येक अनुभवावर तो प्रेम करतो.
मराठी भाषेत शुभेच्छापत्रं सुरु करण्याचा मान त्याच्याकडे जातो.
४ कवितासंग्रह.... १२ चित्रपट.... १६ ध्वनिफिती.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ, नवशक्ती आणि लोकसत्तासारख्या ६ लोकप्रिय दैनिकातलं स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढं बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.


Friday 4 September 2009

प्रसाद्चा सातवा चित्रपट

’नातवंडे’ हा प्रसाद कुलकर्णी यांचा गीतकार म्हणून सातवा चित्रपट दिवाळीच्या सुमारास येऊ घातला आहे. दिलीप प्रधान हे या कौटुंबिक चित्रपटचे दिग्दर्शक असून प्रसादची यातली ३ गाणी साधना सरगम आणि रविन्द्र साठे हे गाणार आहेत. त्यापैकी पहिल्या गाण्याचे ध्वनिमुद्रण नुकतेच ’गॉडस गिफ्ट’ वर्सोवा येथे पार पडले.